Tuesday, 11 February 2020

डॉ.आंबेडकरांची भारतीय राज्यघटना निर्मितीतील भूमिका


प्रस्तावना
भारतीय संविधान निर्मितीत डॉ.आंबेडकरांचे अनन्य साधारण महत्त्व आहे.भारत एक राष्ट्र म्हणून कसे उभे राहील? अशी डॉ. आंबेडकरांची भूमिका होती राज्यघटना समजून घेण्यासाठी  संक्षिप्तपणे राज्यघटना निर्मितीचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामध्ये कंपनी अॅक्ट (1775-1853) च्या प्रस्थापनेपासून ब्रिटिश वर्चस्वाखाली स्वातंत्रपूर्व भारतात कायद्याची प्रक्रिया हळू हळू रूजू होवू लागली. 1775-, 1781, 1784 पिटस इंडिया अक्ट, 1815 चार्टर अक्ट, 1833, 1853, 1858, 1861, 1892 अशा ब्रिटिश कायद्याने भारतीय राजकीय व प्रशासकीय प्रक्रिया व्यापून टाकली. 1909 चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, 1919 चा मॉण्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा व 1935 चा भारतीय शासन अधिनियम, 1940 चा ऑगष्ट प्रस्ताव इ. क्रिप्स मिशन, 23 मार्च 1942, सी.आर. फार्मुला- 1944, वौवल योजना -1945, कॅबिनेट मिशन-1946 यामूळे भारतीय  संविधान निर्मितीच्या दिशा स्पष्ट झाल्या व भारतासाठी भारतीयांचे संविधान निर्माण करावे या कॅबिनेट मिशनच्या चर्चेने भारतीय संविधान निर्मीतीची पाऊले उचलन्यात अली..
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र प्राप्त झाले. भारताची राज्यघटना लिहण्यासाठी पंडित नेहरू यांनी सर आयवर जेनिंगग्स यांना बोलवण्याची शिफारस केली होती परंतु गांधीजीने डॉ.आंबेडकरांसारख्या व्यक्ती  भारतात असतांना त्यांना बोलवण्याची काही गरज नाही अशी भूमिका मांडली. संविधान निर्माण होईपर्यंत 1935 च्या कायद्याचा आधार  होता. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार जुलौ 1946 मध्ये संविधान सभेची निवडणूक झाली. 389 सदस्यापौकी 296 सदस्याची प्रांतीय निवडणूक होती. 10 लाख लोकसंख्येवर एकप्रतिनिधी निवडला गेला 296 पौकी 208काँग्रेस, मुस्लीम लिग 75 व अन्य 15 पक्षाचे स्वातंत्र्य उमेदवार निवडून आले होते.
संविधान सभा तीन टप्यात 
संविधान सभा तीन टप्यात निर्धारित करण्यात आली होती. 
1)पहिला टप्पा  कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेच्या 389 उमेदवाराची निवड
2)  दुसरा टप्पा : मांउट बॅटन  3 जून 1947 च्या अनुसार संविधान सभेचे पुर्नगठन या नुसार 324 प्रतिनिधी होते.
3) तिसरा टप्पा : देशी संस्थानिकांच्या संबंधीत होता त्यांचे प्रतिनिधी संविधान सभेत वेगवेगळ्या वेळी सहभागी झाले.                                    हैद्राबादचा सदस्य सहभागी झाला नाही.
      संविधान सभेचे पहिले अधिवेशन 9 डिसें. 1946 रोजी पार पडले. डॉ.संचिदानंद सिन्हा अस्थायी अध्यक्ष म्हणुन निवडण्यातआले होते. पहिल्या अधिवेशनामध्ये 207 सदस्य उपस्थित होते. 11 डिसेंबर 1946 मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष  म्हणून निवड झाली. बी.एन राव संविधानिक सल्लागार होते. मसुदा समितीने 1 फेब्रु 1948 रोजी संविधान सभेच्या अध्यक्षाला संविधान मसुदा सुर्पद केला संविधानाचे तीन वाचन झाले. 16 नोंव्हे 1949, द्वितीय वाचन 17 नोव्हें 1949 तिसरे वाचन सुरू व  26 नोंव्हे 1949 ला समाप्त झाले. 26 नोव्हें. 1949 ला स्विकार व  26 जाने. 1950 पासून संपूर्ण राज्यघटनेची अमंलबजावणी सुरू झाली. भारतीय राज्यघटना लिहील्या बद्दल डॉ. आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठांनी (अमेरिका) एल.एल.डी. ही पदवी प्रदान केली.

राज्यघटनेतील बलस्थाने आणि डॉ. आंबेडकर 
संघराज्य संबधी आंबेडकरांची भूमिका संघराज्याची  एकात्मक व संघात्मक असे दोन प्रकार आहेत. त्यापौकी संघराज्य स्वरूपाचा स्विकार भारताने केला आहे. डॉ. आंबेडकरानी अशी भूमिका मांडली की,भारत क्षेत्राच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने व्यापक व विविधतापूर्ण असल्यामूळे भारताने संघात्मक पद्धत स्विकारली आहे. राज्यघटना कलम 1 मध्ये भारत राज्याचा संघ असेल असे यात नमूद केले आहे. भारतीय संविधान सभेने संघात्मक व एकात्मक पद्धतीचे मिश्रण केले आहे. भारतीय व्यवस्था संघराज्य का नाही? (4 नोंव्हे 1948 ) संविधानसभेने असा प्रश्न विचारल्यावर डॉ. आंबेडकर म्हणाले की, अमेरिकेतील राज्य करार करून  एकत्र आली आहेत. करार केल्यामुळे  एखाद्या संघराज्यात  सामील  झाल्यावर फुटून बाहेर निघता येणार नाही व तसे भारतात करता येणार नाही म्हणून 'राज्यांचा संघ' म्हणावे लागेल डॉ.आंबेडकर यासाठी संविधानाची सर्वोच्चता, सत्ता विभाजन, लिखीत राज्यघटना व सर्वोच्च न्यायालय इ.बाबींची आवश्यकता प्रतिपादन करतात.जी संघराज्याची मुख्य वौशिष्ट आहेत. तसेच सत्ताविभाजनामध्ये केंद्राला झुकते माप एकेरी नागरीकत्व, राज्य व केंद्राला एकच संविधान, एकीकृत न्याय व्यवस्था,आणीबाणीची व्यवस्था, केंद्रीय लोक सेवा, राज्याची लोक सेवा इत्यादी तत्वाचा अंगींकार करून भारतीय संघराज्याचे नवीन मॉडेल आंबेडकरांनी  निर्माण केले आहे. घटक राज्याना संविधान नसेल, राष्ट्रीयआणि भावनात्मक एकतेसाठी संघराज्याची गरज आहे. म्हणजे यातून आंबेडकरांना एकीकरण घडवून आणायचे होते. आणि स्थीर व जबाबदार शासन निर्माण करायचे होते.

उद्देश प्रस्तावातील भूमिका
पंडित नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेत 'उद्देश प्रस्ताव' मांडला होता यास पुरूषौत्तम  टंडननी अनुमोदन दिले. 22 जाने 1947 रोजी  हा प्रस्ताव सर्वसंमतीने पारित झाला. जगात. सर्वत्र याची प्रशंसा झाली .सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य इ. तत्वज्ञान असलेले "आम्ही भारताचे लोक. अशा आशयाचा प्रस्ताव तयार करण्यात डॉ. आंबेडकरांची भूमिका महत्वाची होती. एच.व्ही कामत यांनी 'देवाच्या नावाने आम्ही भारताचे लोक' आशी शिफारश केली होती. तर आंबेडकर म्हणाले सार्वभौम सत्तेचा स्त्रोत भारतीय जनता आहे. म्हणून हि भारतीय जनतेला अपर्ण असेल. हा सरनामा वाचून सर अर्नेस्ट बार्कर यांनी The principles of social and political theory या ग्रंथात अनुक्रमणिकेनंतर जशीच्या तशी छापली आहे. राज्यघटना निर्मितीचे हे पहिले पाऊल होते. यामध्ये आंबेडकराने महत्वाची भूमिका पार पडली.

संसदीय लोकशाहीची वाटचाल
15 नोव्हें. 1948 रोजीच्या भाषणामध्ये डॉ. आंबेडकर राजकीय लोकशाही व आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा मार्ग सुचवताना म्हणतात की, भारताला लोकशाही माहित नाही असे नाही तर भारत गणराज्यांनी  भरगच्च होता कुठे राजेशाही असेलच तर ती एक तर निवडलेली किंवा सीमीत असायची, त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या तसेच बौद्धकालीन 'संघ' हि संसद होती. लोकसत्ताक पद्धती भारताने गमावली पुन्हा दुस·यांदा तो ती गमावणार काय? नव्याने स्विकारलेल्या लोकशाहीत बाह्य स्वरूप सांभाळेल परंतु प्रत्यक्षातही हुकूमशाहीला स्थान देईल. जर प्रचंड बहुमत असेल तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे. पूढे म्हणतात की, माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की आपल्या सामाजिक  आणि अर्थिक  उद्दिष्टच्या पूर्ततेसाठी आपण संवौधानिक मार्गाचीच कास धरली पाहीजे याचा अर्थ हा की क्रांतीचा रक्तरंजीत मार्ग आपण दुर सारला पाहिजे.
डॉ.आंबेडकांनी जे. एस. मीलचे समर्थन करतांना म्हणाले ,''लोकांनी आपले स्वातंत्र कितीही मोठा व्यक्ति असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.'' सामाजिक लोकशाही, म्हणजे काय तो एक जिवन मार्ग आहे. जो स्वातंत्र, समता, बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. 'एकमत एक मुल्य' याचे सुत्र आहे. सत्ता कुणाच्या हातात राहील हे जनता ठरवील. ग्राम एैवजी व्यक्ति हा केंद्र बिंदू असेल. पुढे म्हणाले की, हजारो जातीमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल. सामाजिक आणि मानसीक दृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढया लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी राजकीय पूढा·यांची प्रमाणिकता आणि प्रशासनाची प्रतिबद्धता आवश्यक आहे. संविधान मिळाले स्वातंत्र प्राप्त झाले याचा अर्थ सर्व काही मिळाले असे नाही. लोकशाही रूपी वृक्ष कोणत्याही मातीत फूलू शकत नाही. त्याकरिता मुल्यविषयक दृष्टीच्या विकासाची गरज आहे. याचा विकास आपण कसा करतो त्यावर संविधानाची श्रेष्ठता सिद्ध होणार आहे. लोकशाही, राष्ट्रवाद, समता, बंधुत्व, मौत्री इ. मूल्यांचे समन्वय संविधानाची विशेषता आहे.
आंबेडकर अशी भूमिका मांडतात की,, 'संविधानिक मार्गाने चालून जर आम्ही देशात समता, बंधूभाव, मौत्री इ. मुल्याची स्थापना करू शकलो नाही. मनुष्याच्या मुलभूत गरजाची पूर्तता करू शकले नाही. किंवा देशात सभ्यवादाच्या वाटेवर चालण्यासाठी जर संविधान आपली भूमिका पार पाडू शकली नाही तर संविधान जाळण्यास लायक असेल.'' याचा अर्थ संविधानाचा दोष आहे, असे नाही तर आंबेडकर म्हणाले होते की, संविधान राबवणारे जर वाईट असतील तर संविधान कितीही चांगले असले तरही ते वाईट ठरेल. म्हणुन सत्ता राबवणा·या शक्ति कशा आहेत? याचा विचार आपणास करावा लागेल.
लोकशाहीच्या यशासाठी  सामाजिक विषमतेचे निर्मूलन, विरोधी पक्षाची आवश्यकता, कायद्यासमोर समानता, घटनात्मक नौतिकता, जनतेची विवेकबुद्धी, लोकशाही मुल्याची जोपासना इ. आवश्यक आहेत.

मूलभूत अधिकार आणि आंबेडकर
मुलभूत अधिकार अमेरिकेसारखे निरंकुश का नाही? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. आंबेडकर म्हणाले की,अमेरिकेतील पहिल्या 10 घटना दुरूस्त्याया मूलभूत अधिकारा संबधी होत्या, पुरावा देतात. , या टिका गौरसमजूतीवर आधारलेल्या आहेत. मुलभूत अधिकार हे अनिर्बंध असतात व मूलभूत नसलेले अधिकार अनिर्बंध नसतात असे म्हणता येत नाही यातील दोघातील मूलभूत फरक असा आहे की, मुलभूत नसलेल्या अधिकाराची निर्मिती पक्षातील कराराद्वारे होते तर मुलभूत अधिकार हे कायद्याची देन आहे. मूलभूत अधिकार राज्याची देन असली तरी राज्याला मर्यादा घालता येणार नाही असे म्हणता येणार नाही. अमेरिकेतील मूलभूत अधिकार अनिर्बंध नाहीत. तर त्यावर बंधने आहेत हे तेथील अनेक कायद्यावरून दिसून येते. म्हणून भारतीय राज्यघटनेत बंधनासहित मूलभूत अधिकाराची तरतुद केली आहे.
भारतीय राज्यघटनेतील भाग तीन मध्ये कलम 12-35 या कलमांअंतर्गत मुलभूत अधिकाराचा समावेश आहे. संविधानसभेत देखील महत्वाचा चर्चेचा विषय होता. डॉ. आंबेडकरांनी मुलभूत अधिकाराचे सर्वाधिक परिक्षण केलेले आहे. 11 दिवस उपसमिती, 2 दिवस सल्लागार व 25 दिवस संविधान सभेत असे 38 दिवस चर्चा झाली. अंतिमत: भारतीय लोकशाहीला अधिक प्रगल्भ करण्यासाठी, भारतीय लोकशाही व भारतातील सामाजिक पर्यावरणाशी अनुरूप अशा मुलभूत अधिकाराची तरतुद करण्यात आली आहे.
समतेचा अधिकार :
कलम 14 मध्ये कायद्यासमोर समानतेचे तत्व, कलम 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग, जन्म इत्यादी आधारावर भेदभाव न करणे, कलम 16 मध्ये सार्वजनिक सेवेत सर्वांना समान संधि, कलम 17 मध्ये अस्पृश्यता निवारण व कलम 18 मध्ये पदव्यांचा अंत (ब्रिटीशांनी सुरू केलेल्या पदव्या सर, राूयबहादूर , रॉय इ.)
स्वातंत्र्याचा अधिकार :
कलम  19 ते 22 अंतर्गत समाविष्ट आहे. कलम 19 मध्ये भाषण, विचार स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 20 मध्ये अपराधा बद्दल दोषी सिद्धी बाबत संरक्षणाचा अधिकार, कलम 21 मध्ये जगण्याचा अधिकार व स्वातंत्र्य रक्षणाचा अधिकार इ. तसेच कलमे 22 मध्ये निवारक निरोध, अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणाची तरतूद, कलम 22-24 अंतर्गत शोषणाविरूद्धचा अधिकार प्रत्येक नागरिकाला बहाल केला आहे. कलम  24 मध्ये बाल कामगारास अवजड कारखाने, खाण इ. ठिकाणी कामास मनाई करणे इ. कलम 25-27 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार बहाल केला आहे. कलम 25 मध्ये कोणत्याही व्यक्तीला स्वत:च्या इच्छेने धर्म स्वीकारणे, प्रचार व प्रसाराचा अधिकार तसेच कलम 26 मध्ये धर्मव्यवहाराची व्यवस्था पाहण्याचा अधिकार, कलम 27 मध्ये शौक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण व उपासनेचे स्वातंत्र्य आहे. कलम 28 मध्ये सांस्कृतिक व शौक्षणिक अधिकार, कलम 29 मध्ये अल्पसंख्यांकाचे हितसंवर्धन व सरंक्षणासंबंधी अधिकाराचा समावेश आहे. कलम 30 मध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या शौक्षणिक संस्था स्थापने व प्रशासनाचा अधिकार इ. कलम 31 मध्ये संपत्तीचा अधिकार समाविष्ट होता. 1976 मध्ये 42 वी घटनादुरूस्ती कलम 31 (ब)  मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायालयाची आहे. अशा संविधानिक तरतुदी असून देखील दलित वंचीत शोंषीतांना न्याय मिळत नाही. शोषणांचे बळी ठरतात व याचे राजकारणच अधिक केले जाते.
कलम 32:
भारतीय राज्यघटनेतील 32 वे कलम संविधानिक उपचाराचा अधिकार प्रदान करतो. मूलभूत अधिकाराचा संरक्षक म्हणून या कलमाची अतिशय महत्वाची भूमिका आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन झाले असेल तर संबंधित अत्याचारा संदर्भात प्रभावित व्यक्ति न्यायालयात धाव घेवू शकतो. तसेच कायदेमंडळाने निर्माण केलेला कायदा, कार्यकारी मंडळाने केलेली अंमलबजावणी मूलभूत अधिकाराला धोका पोहचवत असेल तर सर्वोच्च न्यायालय यास असंविधानिक म्हणून घोषित करू शकतो. या कलमांचे महत्व विषद करतांना डॉ. आंबेडकरांनी 'संविधानाचा 'हदय' किंवा 'आत्मा' असे संबोधले आहे. बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेषण, अधिकार पृच्छा इ. मुलभूत अधिकाराचे संरक्षक म्हणून खंबीरपणे भूमिका पार पाडत आहेत.

 मार्गदर्शक तत्व 
भारतीय राज्यघटनेतील कलम 36-51 (भाग-4) मध्ये समाविष्ट आहेत. कलम 39 मध्ये राज्यनितिचे संचालन आहे. यामध्ये स्त्री पुरूष समान अधिकार, समान वेतन, समान संधी, बालकामगार विरोध, आरोग्य व स्वास्थ, इ. कलम 39 (अ) मध्ये 42 वी घटनादुरूस्ती समान न्याय आणि नि:शुल्क कायदेशीर सहकार्यांचा प्रयत्न, कलम 41 मध्ये काम, शिक्षण, रोजगार व मानवीय परिस्थिती आणि प्रसुति विषयक सहकार्याची तरतुद, कलम 43 मध्ये कामगारांना निर्वाह वेतन, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, कलम 45 मध्ये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद,  कलम 43 मध्ये कामगारांना निर्वाह वेतन, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, कलम 45 मध्ये बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतुद (6 ते  14 वर्ष)  कलम 46 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दुर्बल घटकांचे शौक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन , कलम 47 राहणीमानाचादर्जा, पोषणमान,सार्वजनिक आरोग्य, राज्याचे कर्तव्य, इत्यादी मार्गदर्शक तत्वातील कलमे आहेत या माध्यमातून डॉ. आंबेडकरांना आर्थिक समाता स्थापित करायवयाची होती.

 काही  मागास वर्गासंबंधी विशेष तरतुद :
भारतीय राज्यघटना भाग  16 व  कलम  330-342 कलमा अंतर्गत तरतुद केलेली आहे. कलम 330 लोकसभेत अनुसुचित जाती, जमाती या प्रवर्गासाठी राखीव जागा, कलम 331 लोकसभेत अँग्लोइंडियन समाजाचे प्रतिनिधत्व, कलम 332 राज्य विधानसभेत अनुसुचित जाती-जमाती इत्यादी या प्रवर्गाला आरक्षण, कलम 335 सेवा पदे, इ. अनुसुचित जाती-जमाती या प्रवर्गाला आरक्षण , कलम 336 व कलम 337 काही सेवेत विशेष तरतुद व अँग्लोइडियनांना शौक्षणिक अनुदानाची विशेष तरतुद, कलम 241 अनुसुचित जाती व 342 अनुसुचित जमाती प्रवर्गाकरीता आयोगाची तरतुद असून देखील अनुसुचित जाती, जमातीवरील अत्याचारात दिवसेदिवस वाढच होत आहे.
आणीबाणी  एकसंघ भारतासाठी आवश्यक :
 उदेश मजबुत केंद्र सरकार निर्माण करण्यासाठी जर्मनीकडून घेतले.  आणीबाणी भाग 18 -352-360 मध्ये तरतुद केली आहे. राष्ट्रपतीना हा अधिकार आहे. युद्ध, बाह्य आक्रमण, अंतर्गंत अशांतता इ. पौकी कारण असल्यास राष्ट्रपति राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकतो. ही आणीबाणी पंतप्रधानाच्या सल्यानुसार असावी. 356 व्या कलमाचा गौरवापर होवू नये म्हणून राष्ट्रपतींनी राज्यसरकारला एकदा तरी ताकीद द्यावी यामुळे या कलमाचा गौरवापर होणार नाही.असे डॉ. आंबेडकर म्हणतात.
धर्मनिरपेक्षता आणि डॉ आंबेडकर
धर्म विज्ञान निष्ठ व बुद्धीनिष्ठ असावा. धर्म विज्ञानाच्या कसोटीवर टिकावा, स्वातंत्र , समता, बंधुभाव, न्याय धर्मातील मुल्य असावे, मानवता, धर्म असावा, पुर्नजन्म दैववाद इ.चे पोषण करू नये. राष्ट्रीय मूल्यांना आग्रक्रम देवून मानवाचे बंधुत्वाशी नाते जोडणे हाच धर्मनिरपेक्षतेचा मतितार्थ आहे. अशी आंबेडकरांची भूमिका होती.

सारांश :
टी. टी. कृष्णामाचारी यांनी 5 नोव्हें. 1948 संविधानसभेत म्हणाले की, 'एकूण 7 सदस्यापौकी एन.गोपालस्वामी आयंगर, अलादी कृष्णामास्वामी अय्यर, के.एम.मुनसी, सर मोहम्मद सादूल्ला, एन. माधवन राव, डी.पी.खेतान इत्यादी पौकी एकाने राजीनामा दिला. एका सदस्याचा मृत्यू झाला . एक सदस्य अमेरिकेला गेला, चवथा सदस्य प्रांताच्या कामात व्यस्त होता. एक दोन सदस्य दिल्ली पासून खूप दूर होते. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने मसुदा समितीच्या बौठकीत उपस्थित राहू शकेले नाही. शेवटी झाले असे की, संविधान निर्मितीची जबाबदारी एकट्या डॉ. आंबेडकरांना सांभाळावी लागली. अशा परिस्थितीत परिश्रम घेवून जे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले त्यामुळे सभाग्रहात आदराचे पात्र आहेत. देश त्यांचा नेहमी ऋणी राहील.' एकट्या आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली नाही असा अरोप करण्याऱ्यासाठी ही साक्ष पुरेशी आहे. यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरतात.

Saturday, 8 February 2020

भारतातील जातलक्षी राजकारण : वास्तव आणि बदलते समीकरणे

प्रस्तावना :
परंपरा प्रिय भारतीय समाजामध्ये आधूनिक राजकीय संस्थांची स्थापना हे भारतीय राजकारणाचे अदभूत वैशिष्टये आहे. भारतामध्ये राजकीय आधूनिकीकरणाचा प्रारंभ झाल्यानंतर पाश्चात्य राजकीय संस्था आणि लोकशाही मुल्यांचा स्विकार केल्यामूळे पारंपारिक जाती संस्थाचा अंत होईल असे वाटत होते. परंतु स्वातंत्र्या नंतरच्या काळात भारतीय राजकारणात जातीचा प्रभाव वाढत आहे. भारतीय समाजाची जडणघडण लोकशाहीप्रणीत समतेवर करण्यासाठी जातीयता प्रामुख्याने आड येत असते जातीयतेचे सामाजिक आणि धार्मिक स्वरूप पूर्वीपेक्षा काही कमी भयंकर व कमी जाचक होताना दिसते पण त्यावेळी तिचे राजकीय व प्रशासकीय स्वरूप मात्र  अनेकांना चिंताजनक वाटते. सुशिक्षीत, शहरी पाश्चात्यकृत अशा अत्यल्प वरच्या वर्गात जातीयतेची तिव्रता कमी आढळते रोटी - बेटी व्यवहार बरेच मोकळेपणाने होतांना दिसतात. पण यावरून  जातीयता  नष्ट होत आहे असे म्हणने म्हणजे अतिश्योक्तीचे होईल. जातीयतेला या देशातील अनेक सामाजिक, राजकीय व घटनात्मक गोष्टी जातीयतेला पोषक ठरल्या आहेत ठरत आहेत. लोकशाही आणि  जात प्रतिनिधिक संस्थांच्या स्थापननंतर भारतातील जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे तर काही विद्वानाच्या मते जातीव्यवस्था पारंपारिक शक्तीच्या रूपाने कार्य करत आहेत आणि राजकीय विकास व आधूनिकीकरण मार्गातील अडथळा आहे. या संबंधी प्रारंभी कोठारी यांचे मत असे आहे की, `` 
१) कोणतीही  सामाजिक व्यवस्था कधीच पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही.त्यामुळे भारतातील जातीच्या प्रभाव कमी होत आहे असे म्हणणे अर्थशुन्य आहे
 २)  जाती व्यवस्था आधूनिकीकरण आणि सामाजिक  परिवर्तन यामध्ये अडथळा निर्माण करत नाही. तर या प्रक्रीयेपेक्षा गतीमान करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 
३) स्थानिक आणि राज्यस्तरावरील  राजकारणामध्ये जातींचा संप आणि समुह  निर्णय प्रक्रियेस प्रभावित करण्यामध्ये पाश्चात्य  देशातील दबावगटाप्रमाणे भूमिका बजावतात 
 ४) भारतातील राजकीय नेते एकीकडे जातीगत भेदभाव नष्ट करण्याची घोषणा करतात तर दुसरीकडे जातीच्या आधारावर मते मिळविण्याचा प्रयत्न करतात.

जातीचे राजकीय स्वरूप 

प्रा. रजनी कोठारी यांनी आपल्या `` भारतीय राजकारणातील जात '' या पुस्तकामध्ये भारतीय राजकारणातील जातीच्या भूमिकांचे विस्तृतपणे विवेचन केले आहे. त्यांच्या मते नेहमीच असा प्रश्न विचारला जातो की, भारतातील जातीव्यवस्था नष्ट झाली आहे का? या प्रश्नामागे असा दृष्टीकोन दिसून यतो की, जाती व्यवस्था आणि राजकारण ह्या परस्पर विरोधी संस्था आहेत. खरे पाहता  मुख्य प्रश्न असा निर्माण होवू शकतो की जाती व्यवस्थेचा राजकारणावर काय प्रभाव पडत आहे आणि विविध जाती -उपजाती असणाऱ्या समाजातील राजकारणाचे स्वरूप  कशाप्रकारे बदलत आहे. जे लोक राजकारणात जातीयवाद शिरला असल्याची तक्रार करतात ते राजकारणाच्या स्वरूपात आणि त्याचबरोबर जातीच्या आधारावर संघटीत आहेत. त्यामुळे  अपरिहार्यपणे राजकारणात जातीव्यवस्थेचा वापर करावाच लागणार आहे. राजकारणात जातीव्यवस्थेचा अर्थ, जातीचे राजकीयकरण असा आहे जातीस आपल्या क्षेत्रामध्ये सोडून तिचा आपल्या कार्यामध्ये मदत घेण्याचा प्रयन्त राजकत्र्याकडून केला जातो. दुसNया बाजूस राजकारणाद्वारे जाती आणि उपजातींना देशाच्या शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची संधी प्राप्त होते राजकीय नेत्यांना सत्ता प्राप्तीसाठी जातीय गटांचा फार मोठा उपयोग होतो. आणि जातीच्या रूपाने त्यांना संघटीत गट प्राप्त होतात. त्यामुळे त्यांना राजकीय संघटना उभी करणे सोपे जाते.
भारतातील जाती व्यवस्था आणि राजकारण यांच्यातील आन्तरक्रिये संदर्भात रजनी कोठारी यांनी जाती प्रथेची तीन रूपे कींवा पैलू सांगितले आहेत.

जातीचे तीन पैलू

१. जाती व्यवस्थेचे लौकीक किंवा धर्मनिरपेक्ष स्वरूप
२. जाती व्यवस्थेचे एकात्मक  कींवा एकिकृत स्वरूप
३. जाती  व्यवस्थेचे चैतन्य कींवा जाणीवात्मक स्वरूप.

1)जाती व्यवस्थेचे लौकीक किंवा धर्मनिरपेक्ष स्वरूप
प्रा.रजनी कोठारी यांनी जातीव्यवस्थेच्या लौकीक स्वरूपास व्यापक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला आहे. जाती व्यवस्थेच्या काही बाबीने संघर्षाचे लक्ष वेधले आहे. जसे की, जाती ह्या विवाह स्पृश्या-स्पृशता, रिती-रिवाज यांच्या साह्याने आपले वेगळे अस्तीत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु वेगवेगळया जातीमध्ये आप-आपसात प्रतिस्पर्धा तसेच गटबंदी राहत असून प्रत्येक जात प्रतिष्ठा आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी नेहमी संघर्ष करीत असतात. यामुळे मात्र खूपच कमी लोकाचे लक्ष वेधले गेले आहे. उदा. आजकाल बिहारमध्ये उच्च आणि निम्न जातीमध्ये सत्ता प्राप्तीसाठी सतत संघर्ष चालू आहे. याच कारणामुळे जनता शासनाच्या काळात दोन्ही मुख्यमंत्री  मागास आणि अनुसूचित जातीमधून आलेले होते. जातीच्या या लौकीक बाजूचे दोन रूपे आहेत एक शासकीयरूप म्हणजे, जातीकडे ग्रामसभा विंâवा ग्रामपंचायत असणे आणि दुसरे रूप राजकीय होते म्हणजेच जातीमधील आंतरीक गटबंदी आणि अन्य जातीशी तडजोड आणि प्रतिस्पर्धा स्थानिक नेत्यांचे समाजातील केंद्रीय
 सत्तेशी कशाप्रकारचे संबंध आहेत यावर या गटाचा प्रभाव अवंलबून होता.धर्मव्यवसाय, आणि प्रदेशावर या जातीची स्थीती  आधारित असते. सुरूवातीला या जातीचा संबंध जातपंचायत कींवा ग्रामपंचायत आणि राजा विंâवा जमीनदार यांच्याशी राहत असे परंतू आज जातपंचायतीच्या जागी राष्ट्रीय सरकार आहे.
रजनी कोठारी यांच्यामते भारताच्या राजकारणावर कोणत्याही एका जातीचे वर्चस्व राहिलेले नाही. कारण काही ठिकाणी ब्राम्हणांचे वर्चस्व होते तर काही ठिकाणी जसे की गुजरात आणि मारवाडमध्ये जैन, वैष्णव यासारख्या सांप्रदायाच्या हातामध्ये अर्थिक  शक्ती केंद्रीत झालेली होती.
2) जातीव्यवस्थेचे एकात्मिक किंवा एकीकृत स्वरूप:
जातीचे दुसरे स्वरूप व्यक्तीस समाजाशी बांधणारे म्हणजे एकीकृत होय. जाती व्यवस्था जन्माबरोबर व्यक्तिचे समाजातील स्थान निश्चित करते. जातीच्या आधारावरच त्या व्यक्तिचा व्यवसाय आणि आर्थिक भूमिका निश्चित होत असते. व्यक्तिचा व्यवसाय आणि आर्थिक भूमिका निश्चित होत असते, व्यक्ति कितीही मोठा झाला तरी त्याला  आपल्या समाजाविषयी आपुलकी  निर्माण होत असते आणि जातीप्रति त्याची निष्ठ दृढ बनत असते. व्यक्तिची हिच निष्ठ पूढे चालून व्यापक व्यवस्थेप्रति  विकसीत होवू शकते. अशाप्रकारे जाती ह्या जोडणाNया  कड्याचे काम  करतात. लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या समुहामध्ये शक्तिप्राप्तीसाठी स्पर्धा चालते आणि वेगवेगळ्या जाती आप-आपसात तडजोड करून सतेत  वाटा मिळविण्यासाठी आघाडी बनविण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते.
३) जातीव्यवस्थेचे चैतन्य स्वरूप विंâवा जाणीवात्मक स्वरूप :
जातीव्यवस्थेचे तीसरे स्वरूप  कींवा पैलू म्हणजे चेतना, बोध विंâवा जाणीव निर्मिती करणे होय. काही जाती स्वत:स श्रेष्ठ समजतात त्यामुळे  समाजात  त्यांची विशिष्ट प्रतिष्ठा असते. त्यामुळे काही कनिष्ठ समजल्या  जाणाNया जातीदेखील स्वत:स वरिष्ठ जातीशी  जोडण्याचा प्रयत्न करतात. क्षेत्रीय वर्णास असलेल्या प्रतिष्ठेमुळे देशातील अनेक जातींनी आपण क्षेत्रीय असल्याचा दावा केल्याचे दिसते तर काही जातींनी ब्राम्हण असल्याचा दावा केला आहे. राजकीय, आर्थिक आणि समााजिक स्थितीमध्ये होणाNया परिवर्तनामूळे देखील जातीची विशिष्ट स्थिती  बदलत असते. सामाजिक व्यवहारात वेगवेगळया स्तरावर वेगवेगळे स्वरूप धारण केल्यामुळे जाती व्यवस्थेमध्ये लवचिकता आणि परिवर्तनशीलता येते हे परिवर्तन चार मार्गानी घडून येते.
१. सांस्कृतीकरण :  यामध्ये कनिष्ठ जाती सामाजिक प्रतिष्ठा अर्जित करण्यासाठी ब्राम्हणांच्या रितीरिवाजांची नक्कल करतात यालाच ब्राम्हणीकरण देखील  म्हटले जाते. 
२. लौकीकरण आणि अब्राम्हणीकरण : आर्थिक विकास, राजकीय एकता आणि बुद्धीवादाच्या प्रभावामुळे बहुदा ब्राम्हणेत्तर जाती ब्राम्हणाची नक्कल करण्याच्या प्रवृतीच्या त्याग करून, इतर ब्राम्हणेत्तर जातीशी मिळून रा. आणि सा. अधिकार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.
३. महापुरूषांशी संबंध जोडणे.
४जातीचे धर्मनिरपेक्षिकरण
      
      भारतीय राजकारणात जातीची भूमिका 

जयप्रकाश नारायण - यांनी एकदा म्हटले होते की, जात भारतातील एक महत्त्वाचा पक्ष आहे. 
हेरॉल्ड गोल्ड -यांच्या शब्दात ``जात राजकारणाचा आधार असण्याबरोबर त्यास प्रभावित करणारे एक महत्त्वाचे तत्व आहे.''
जातीव्यवस्था हे भारतीय समाजाचे एक म्हत्त्वाचे वैशिष्टये आहे. स्वातंत्र प्राप्तीनंतर संविधान आणि आधूनिक संस्थाच्या निर्मीतीमूळे भारतीय समाजामध्ये आधूनिक तत्त्वाचा हळूहळू  प्रवेश होण्यास प्रारंभ झाला आधूनिक दृष्टीकोणामुळे  प्रौढमताधिकाराच्या आधारे निवडणूका लढविल्या जावू लागल्या आणि जाती व्यवस्थेस एकदम महत्त्व प्राप्त झाले. कारण त्यांच्याकडे एक गठ्ठा मते होती आणि लोकशाही  मध्ये आणि लोकशाहीमध्ये सत्ताप्राप्तीसाठी या मतांना अनन्य साधारण महत्त्व आहे. ज्यांना सत्ता आकांक्षा होती. त्यांना सामान्य जनतेपर्यंत  पोहचण्यासाठी संपर्वâ सुत्रांची आवश्यकता होती. सामान्य जनतेला आपल्या बाजूने वळविण्यासाठी त्यांना समजेल अशा भाषत्ो बोलणे गरजेचे होते. ती भाषा म्हणजे जातीची भाषा होय. अशा प्रकारे जातीची राजकारणातील भूमीका अधिकच महत्वपूर्ण बनत गेली. भारतीय राजकारणातील जातीच्या भूमिकेचा अभ्यास खालील मुद्यांच्या आधारे केला जावू शकतो.
१. निर्णय प्रक्रियेत जातीची प्रभाव :
भारतात  जाती संघटीत होवून शासकीय व राजकीय निर्णय प्रक्रियेला प्रभावीत करतात उदा. संविधानामध्ये  अनु जाती अनु.जमातीच्या आरक्षणासाठी  व्यवस्था करण्यात आली आहे. या सवलती आणखी काही वर्षासाठी वाढवण्यासाठी  या जाती संघटीत होवून सरकारवर दबाव टाकतात. तर इतर जाती अरक्षण समाप्त करण्याची मागणी करतात विंâवा आरक्षणाच्या आधार सामाजिक आर्थिक स्थिती या आधारावर आरक्षणाचा फायदा मिळावा अशी मागणी करतात.


२.राजकीय पक्षामध्ये जातीयआधारावर निर्णय : 
भारतातील सर्वच राजकीय पक्ष आपल्या उमेदवाराची निवड जातीय आधारावर करतात. प्रत्येक पक्ष कोणत्या ही मतदारसंघातून उमेदवार निश्चित करण्या आगोदर जातीय समिकरणाचे विश्लेषण करतात.  १९६२ मध्ये गुजरात मधील निवडणूकीत स्वतंत्र पार्टीच्या यशस्वीतेचे रहस्य त्यांनी क्षेत्रीय जातीस दिलेले समर्थन यामध्ये दडलेले होते. हरीजन, मुस्लमान, ब्राम्हण यांच्या एकत्रीत शक्तीसामथ्र्यावर काँग्रेसने १९७१ च्या सार्वत्रिक निवडणूकीत विजय संपादन केला होता. १९७१ मध्ये जनता पार्टीच्या विजयाचे कारण मुसलमान व बहुजनाबरोबर त्यांना उच्च जातीचे मिळालेले समर्थन हे होते.  जानेवारी १९८० च्या सातव्या लोकसभा निवडणूकीत श्रीमती इंदिरा गांधी, हरीजन, ब्राम्हण, आणि मुसलमानाचे जातीय समर्थन मिळवण्यात यशस्वी झाल्यामुळेच काँग्रेसला विजय संपादन करता आला. उत्तरप्रदेशात  बहुजन समाजपार्टीचा उदय आणि सफलता दलीत जातीच्या समर्थनांवर आधारित आहे. काँग्रेस देखील  सर्वच राजकीय पक्षामध्ये जातीय आधारावर अनेक गट आहेत की, ज्यांच्यामध्ये स्पर्धेची भावना विद्यामान असते.
लोकामध्ये जाती जाती विषयी असलेल्या निष्ठेकडे राजकीय नेते एकगट रूपाने पाहतात सत्तेत येण्यासाठी आणि सभागृहामध्ये बहूमत  मिळवण्यासाठी बहूमत प्राप्त करण्यासाठी  राजकीय नेते जातीच्या आधारावर उमेदवाराची निवड करतात आणि सत्तेमध्ये आल्यावर त्यांना पद विंâवा अन्य प्रकारचे फायदे मिळून देतात.
३. जातीय आधारावर मतदान व्यवहार :
भारतात निवडणूक प्रचारामध्ये जातीस एक साधन म्हणून वापरले जाते. उमेदवार ज्या मतदार संघातून निवडणूक लढत असले त्या मतदारसंघात संबंधीत उमेदवारांकडून जातीय भावनेस आवाहन केले जाते. त्यामुळे त्यास आपल्या जातीच्या मतदारांचे पूर्ण समर्थन प्राप्त होते. जानेवारी १९८० च्या निवडणूकीत उत्तरप्रदेश आणि काही प्रमाणात बिहारमधील काही भागात लोकदलाची यशस्वीता ही मागास जातीच्या राजकीय इच्छा शक्तिचे प्रतिक आहे. उत्तरप्रदेशातील निवडणूकीत चरणसिंग यांची सफलता ही नेहमीच जाट जातीच्या मताच्या एकजुटीवर आधारीत राहिलेली आहे. माक्र्सवादी पक्षाने मते जुळवण्यासाठी नेहमीच जातीचा आधार घेतला आहे.
मंडळ आयोगा वरील विवादानंतर १५९०-९१ मध्ये ओबीसी समाजात जातीच्या आधारावर एकप्रकारचा जातीयंसघर्ष उभा राहिला. राजकीय पक्ष या मुद्यावर राजकारण करू लागले.
भाजपाच्या आयोद्या आंदोलनाची प्रतिक्रिया म्हणून देशातील दोन मोठया राज्यात उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये एका अनेख्या, सामाजिक, राजकीय गटबंधानाचा  जन्म झाला ज्याचे जनक अनूक्रमे, मुलायमसिंह यादव, लालुप्रसाद यादव हे होते या गटबंधनामुळे मुसलमान आणि यादव यामुळे  एक मोठा भाग एकजूट झाला.
निवडणूकीत तिकीट वाटप करताना राजकीय पक्ष मतदारसंघातील जातीय सरंचनेवर अधिक लक्ष देतात. यामुळे अनेक कनिष्ठ जाती आपल्या संख्यात्मक शक्तीच्या आधारावर राजकीय दृष्टीने प्रभावी बनल्या आहेत. प्रो. रजनी कोठारी च्या मते राष्ट्रीय राजकारणातील जातीचा प्रभाव कमी होत चालला आहे. हेरॉल्ड गोल्ड हे देखील या मताचे समर्थन करतात. यांच्यामते भारतामध्ये आज राजकीय निर्धारक म्हणून जातीचे महत्त्व कमी होत आहे. वरील विद्ववानाच्या मतामध्ये तथ्यांश असला तरी भारतीय मतदारामध्ये मतदान व्यवहारात जात हे एक प्रबळ नाव असल्याचे नाकरता येत नाही.
४. मंत्रिमंडळात जातीवर आधारित प्रतिनिधत्व :
राजकीय जिवनात देखील जातीयवादाचा सिंद्धात इतका खोलवर रूजलेला आहे की, मंत्रीमंडळ निर्मीती करताना प्रत्येक प्रमुख जातींना मंत्रीमंडळातील स्थान द्यावेच लागते. हा सिद्धांत राज्य मंत्रिमंडळापासून ते ग्रामपंचायत स्तरापर्यंत  लागू होतो. एवढेच नव्हेतर वेंâद्रीय मंत्रिमंडळात देखील दलित, आदिवासी ,शिख, मुस्लीम, ब्राम्हण, जाट, राजपूत आणि कायस्थाना कोणत्या ना कोणत्या रूपात स्थान आवश्यक दिले जाते.
५. जातीय दबावगट  :
मेयर, च्या मते, जातीय संघटना राजकीयदृष्टया महत्त्वाचे दबावगट म्हणून कार्यरत आहेत. जातीय दबावगट आपल्या हितसंबंधाच्या पुर्ततेसाठी ज्या प्रकारे नितीनिर्धारकांना प्रभावीत करतात त्यावरून  त्यांची तुलना यूरोप आणि अमेरिकेतील ऐच्छिक समुदायांशी केली जावू शकते.
अनेक जातीय संघटना आणि समूह जसे की, तामीळनाडू नाडार जाती संघ, गुजरातमध्ये क्षेत्रीय महासंघ, बिहारमध्ये कायस्थ सभा, वगैरे राजकीय बाबतीत रस घेवू लागतात आणि आपल्या संघटीत शक्तिच्या बळावर राजकीय सौदेबाजी देखील करतात, वस्तु: देशातील सर्वच प्रमुख जातींना अशा प्रकारे पुर्णत: संघटीत केले जावू शकत नाही. परंतु ज्या जाती अशाप्रकारे संघटीत होवू शकल्या नाहीत आणि त्यांच्या सदस्यांना आवाज उठवण्यासाठी उपद्रव आणि तोड फोडीचा सहारा घ्यावा लागला.


६. जाती आणि प्रशासन :
लोकसभा आणि विधानसभेत काही जागा विशिष्ट जातीसाठी  राखीव आहेत. वेंâद्र आणि राज्य सरकारच्या नोकरीत आणि पदोन्नतीसाठी जातीय आधारावर आरक्षणाची तरतुद आहे. मेडीकल आणि इंजिनिअरींग कॉलेजमध्ये विद्याथ्र्यांच्या प्रवेशासाठी देखील आरक्षणाची व्यवस्था आहे. राष्ट्रीय मोर्चा सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करून, नोकNयामध्ये इतर मागास वर्गीय जातींसाठी २७ टक्के  आरक्षणाची तरतुद केली भारतातील ,स्थानिक  स्थरावरील प्रशासकीय अधिकारी निर्णय घेताना आणि निर्णयाची अमलबजावणी करतांना प्रमुख आणि प्रतिष्ठीत विंâवा संगठीत जातींच्या नेत्यांच्या प्रभावाखाली येतात.
. राज्याच्या राजकारणातील जातीय समीकरणे
मायकेल ब्रेचर :  मते आखील भारतीय राजकारणापेक्षा राज्य स्थरावरील राजकारणावर जातीवादाचा प्रभाव अधिक राहिला आहे. कोणत्याही राज्याचे राजकारण जातीय प्रभावापासून आलिप्त राहिलेले नाही. बिहार, केरळ, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र हरियाणा आणि राज्यस्थान या राज्याच्या राजकारणाचा अभ्यास जातीय गणितांच्या विश्लेषण शिवाय करता येणे शक्य नाही. बिहारच्या राजकारणात राजपूत, ब्राम्हण, कायस्त आणि आदिवाशी प्रामुख्याने प्रतिस्पर्धी जाती आहेत. पृथक झारखंड राज्याची मागणी ही वस्तुत: जातीय मागणीच होती. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आणि ब्राम्हण तसेच ओबीसी समाज प्रामुख्याने प्रतिस्पर्धी आहेत. थोडक्यात राज्याच्या राजकारणात जातीचा प्रभाव एवढया मोठया प्रमाणावर दिसून येतो की, टिंकर म्हणतात, राज्याचे राजकारण म्हणजे जातीचे राजकारण अशी संज्ञा देतात.
देशातील  सर्वाधिक लोकसंख्ये असणारे राज्ये उत्तरप्रदेश आणि बिहार मध्ये जातीचे राजकारण मोठया प्रमाणावर दिसून येते. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली  जातीच्या राजकारणाचे मूळ बळकट झाले तर जातीच्या आधारावर उत्तरप्रदेश मध्ये मुलायमसिंह  यादव व काशीराम यांची प्रतिनिधी मायावतीनी जातीच्या वोट बँकेच्या आधारावर राज्यास जातीय संघर्षाकडे ढकललेले आहे.
८. जातीच्या आधारावर नेतृत्वाचा उदय :
अलौकिक व्यक्तित्व राजकीय पक्षातील सदस्याचे समर्थन या आधारावर तसेच सामाजिक परिस्थीती  आणि सामाजिक समस्याची सोडवणूक करण्यासाठी नेतृत्वाचा उदय होत असतो.  त्याचबरोबर जातीचा देखील राजकीय अभिजनाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस पक्षात केवळ उच्च जातींनाच महत्त्वाचे स्थान होते. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात मध्यम आणि कनिष्ठ जातींच्या व्यत्तिंâना देखील राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी संधी प्राप्त झाली. आरक्षणाच्या धोरणामुळे कनिष्ठ जातीतून नेतृत्व उदयास आले. तर शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्थिती सुधारणेमुळे आणि १९५० नंरतच्या काळातील राजकारणातील स्पर्धेमुळे मध्यम जातीमधून नेतृत्वाचा उदय झाला. अशाप्रकारे जातीव्यवस्थेने पारंपारीक कार्याबरोबरच शहरातील आणि गावातील लोकांच्या राजकीय व्यवहारास नियमित व नियंत्रीत करण्याच्या नविन भूमिकेचा स्विकार केला आहे. 

सारांश :
 वर्तमान  भारतीय राजकारणातील जात वास्तव नाकारता येत नाही.करण जातीच्या राजकीय व लोकशाही कारण मुळे ती सत्ता बदलाची चावी ठरत आहे. म्हणून भारतातील कोणताही राजपक्ष्य जातलक्षी राजकारण नाकारू शकत नाही. तर  जातीय समीकरनेचे सत्तेचे स्वरूप नश्चित करीत आहेत. सुभाष कश्यप या अभ्यासकाने हरियाणा, राजस्थान, बिहार इत्यादी राज्यातील राजकारणावरील जातीय प्रभावाचा अभ्यास केला तेंव्हा त्यांच्या असे निदर्शनास आले की, जात हीच मुख्यतत्व आहे. हरियाणातील निवडणूकीचे उदाहरण देतांना ते म्हणाले  `जाट की बेटी जाट को ओर जाट का जाट को' तसेच  कहार जातीचे म्हणने होते की, `कहार का वोट कहार को ओर कहार की बेटी कहार को' या दोन्हीं जाती या प्रदेशामध्ये बहुसंख्यांक आहे. त्यामुळे त्या जातींचा प्रभाव आपणास दिसून येतो. यावरून  असे स्पष्ट होते की, सामाजीक ,राजकीय, आर्थिक जिवनात देखील जात ही महत्त्वाचे भुमिका बजावत आहे. म्हणून जी जात नाही ती जात असेच म्हणावे लागेल.
                                 डॉ. सत्यपाल कांबळे