Monday, 6 January 2020

छत्रपती शाहू महाराजांचे न्याय संबंधी विचार



प्रस्तावना : 
महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारणावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी  शाहु महाराज, व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आहे.  महारा ट्राच्या जडणघडणीत प्रामुख्याने या महापुरुषांचे योगदान राहिलेले आहे. महात्मा जोतीबा फुले यांच्या नंतर शाहु महाराजांनी केलेले कार्य हे उल्लेखनिय आहे. चौथ्या शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर 17 मार्च 1884 रोजी कोल्हापुरच्या गादीवर सत्तेवर विराजमान झाले. 2 एप्रिल 1894 रोजी महाराजांना राज्याधिकार प्राप्त झाला. कोल्हापुर संस्थानाचे पुरोगामी व समाजसुधारक राजा अशी ओळख प्रस्तापित झाली. प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यता, जातीभेद निवारण इ. कार्ये हाती घेतले होते. महाराजांनी प्रशासनाची पुनर्रचना करुन भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लट्ठे इ. सारख्या बहुजनातील गुणवंत व्यक्तींना महत्त्वपूर्ण अधिकार पदावर नेमण्यास सुरुवात केली. अशा अनेक कार्यातुन शाहु महाराजांनी अनुभवसिद्ध व व्यावहारिक न्याय प्रयोगशिलतेवर भर दिला. याचे फलित म्हणजे भारतीय राज्यघटनेत न्यायाचे तत्त्व सामावलेले आहे व ते आदर्शवत आहे. प्रस्तुत लेखात शाहु महाराजांच्या कार्यातुन सामाजिक न्यायाच्या प्रेरणा, समाजसुधारणा व समाजपुनर्रचनेत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. काही निवडक उदाहरणावरुन थोडक्यात समजुन घेता येईल. 


अस्पृश्य उद्धार व जातीय निर्मुलनाची दिशा :

शाहु महाराजांनी जाती व अस्पृश्यता निर्मुलनाचा कार्यक्रम हाती घेतला होता. समाजातील या दु ट प्रवृत्तीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी संस्थानामध्ये अस्पृश्यता विरोधी कायदा आणला. अस्पृश्यता ही निसर्ग निर्मित नसुन ती मानव निर्मित आहे. म्हणुन कोणत्याही व्यक्तीने जातीच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा अनुनय करु नये. सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, सरकारी कार्यालये, शाळा, पानवटे इ. सार्वजनिक ठिकाणावर अस्पृश्यता पाळणा·यांवर कडक शिक्षा करण्याची तरतुद केली होती. कोल्हापुर संस्थानात जातीय तेढ वाढवणारे 'महारवतन' बंद करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. महाराजांनी जाती व अस्पृश्यता सामाजिक पातळीवरुन हद्दपार व्हावी म्हणुन अस्पृश्य जातीतील लोकांना सौनिक व पोलिस, ड्रायव्हर, माहुत, हुलस्वार, कुत्तेवान अशा नोक·यांमध्ये सामावुन घेतले होते. यामुळे येथील विषमता व द्वेशमुलक समाजरचनेला आव्हान उभे केले होते. शाहु महाराजांच्या रुपाने आम्हाला खरा देव मिळाला आहे अशी भावना जनतेत निर्माण झाली होती. मार्च 1920 रोजी महारा ट्र दलित परिषदेचे प्रथम अधिवेशन कोल्हापुर संस्थानातील मानगाव या गावी भरले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभेचे अध्यक्ष होते. विशे ा म्हणजे शाहु महाराज या सभेला उपस्थित होते. 'मुकनायक' महाराजांच्याच सहकार्यामुळे सुरु करण्यात आले होते. या सभेला संबोधित करतांना महाराज म्हणाले,  'तुम्ही तुमचा पुढारी शोधला आहे. याबद्दल मी अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर एकवेळ अशी येईल आंबेडकर सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील.' 30 मे 1920 रोजी अखिल भारतीय बहि कृत समाज परिषद् नागपूर येथे पार पडली. शाहु महाराज अध्यक्ष होते. जनतेला मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले, 'अस्पृश्यता हा शब्द कोणत्याही व्यक्तीला लावणे फार निंदणीय आहे. तुम्ही अस्पृश्य नाहीत. तुम्हास अस्पृश्य मानणा·या पु कळ लोकांपेक्षा अधिक बुद्धीमान, पराक्रमी, सुविचारी, स्वार्थत्यागी असे तुम्ही हिंदुस्थानचे घटकावय आहात. मी तुम्हाला अस्पृश्य समजत नाही. आपण बरोबरीचे भावंडे आहोत. सर्वांना हक्क समान आहेत असे समजले पाहिजे.' या परिषदेचे तिसरे अधिवेशन फेब्रुवारी 1922 मध्ये भरले. यावेळी देखिल शाहु महाराज अध्यक्ष होते. अस्पृश्यता आत्मउद्धार व स्वाभीमान जागवण्याचा सदोदीत प्रयत्न केला आहे. गंगाधर कांबळे नावाच्या अस्पृश्य व्यक्तीला कोल्हापुर येथे हॉटेल सुरु करुन दिले व स्वत: आपल्या लवाजम्यासहित चहा घेण्यासाठी जात असत. यामुळे अस्पृश्यता निर्मुलनात महत्त्वाची दिशा प्राप्त झाली. परिणामी राज्यघटनेत कायद्याच्या माध्यमातुन प्रतिबिंबित होते. 


सर्वांना शिक्षण :

शिक्षण हे सामाजिक प्रगतीचे माध्यम आहे. शिक्षणाशिवाय आत्मविश्वास व आत्मउद्धार करणे शक्य नाही. म्हणुन हजारो वर्णापासुन सामाजिक संधी नाकारलेल्या उपेक्षित, वंचित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातुन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शाहु महाराजांनी केला आहे. आपल्या संस्थानात 1917 मध्ये   सक्तीचे मोफत शिक्षण प्राप्त करण्याचा कायदा केला व प्राथमिक शिक्षणावर भर दिला होता. सर्व शुद्र, अतिशुद्र, महिला या सर्वांना सहज शिक्षण प्राप्त व्हावे म्हणुन 1896 मध्ये पहिले वसतीगृह स्थापन केले. तसेच प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे वसतीगृहे स्थापन केले. 1912 मध्ये अस्पृश्यांच्या शाळांची संख्या 27 होती. यामध्ये अस्पृश्य समजल्या जाणा·या महार, मांग, चांभार, ढोर इ. जातींचा समावेश होता. 

गरिब विद्यार्यांसाठी शि यवृत्ती, वौद्यकीय शिक्षण घेणा·या विद्याथ्र्यांसाठी शि यवृत्त्या, ग्रामीण भागात वाचनालये प्रारंभ करण्यात आले. एकट्या कोल्हापुर नगरामध्ये 22 ते 25 वसतीगृहांची संख्या होती. शाळांची स्थापना करण्यामागे महाराजांचा उद्देश होता तो, माझी जनता  शिक्षण घेवुन विद्याविभुशीत झाली तर मी माझे राज्य जनतेच्या हवाली करेल. असे जाहिर करणा·या आणि प्राथमिक शिक्षणाचा कायदा सुमारे 100 वर्षापुर्वी अंमलात आणणा·या शाहु महाराजांचे शौक्षणिक विचार, कार्यपद्धती, दृष्टेपणा, दुरदृष्टी इ. मुळे कोल्हापुर संस्थानातील जनतेची वौचारिक वाढ होत गेली. यावरुन महाराजांची शिक्षणाविषयीची भूमिका लक्षात येते. शिवाय व्यावसायिक शिक्षणावरही भर दिला होता. 


स्त्री दास्य मुक्ती :

प्राचीन काळापासुन स्त्रीयांना दुय्यम व हीन मानले आहे. ख·या अर्थाने महात्मा फुले यांच्यापासुन स्त्री उद्धाराच्या कार्याला प्राथमिकता देवुन स्त्री दास्य मुक्तीचा मार्ग अवलंबला होता. तेच कार्य शाहु महाराजांनी पुढे चालवुन स्त्रीयांचा उद्धार हाती घेतला होता. स्त्रीयांना दास्यातुन मुक्त करण्यासाठी शिक्षण हे प्रभावशाली माध्यम आहे. म्हणुन स्त्रीयांच्या शिक्षणावर अधिक भर दिला होता. हुशार मुलींना शि यवृत्ती देण्यात येत होत्या. प्रौढ स्त्रीयांच्या शिक्षणा बाबत विशेष  महत्त्व दिले. 1919 मध्ये मागासवर्गीय स्त्रीयांसाठी राहण्याची व जेवण्याची मोफत व्यवस्था केली होती. जेंव्हा लिटल मैडम या ब्रिटीश महिला शिक्षणाधिकारी मायदेशी परतल्या नंतर त्यांच्या जागेवर राजर्षी शाहु महाराजांनी कोल्हापुरातील फिमेल ट्रेनिंग स्कुल मध्ये शिक्षिका असणा·या रखमाबाई केवळकर या महिलेची नेमणुक केली होती. पुढे त्यांनी स्त्री शिक्षणाला अधिक गती दिली होती. शाहु महाराजांनी मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणुन त्यांना विविध प्रकारची बक्षिसे व शि यवृत्त्या देण्यास सुरुवात केली. स्त्रीयांसाठी अहिल्याबाई मुलींची शाळा, लक्ष्मीबाई मुलींची शाळा या हेतुनेच प्रारंभ करण्यात आल्या होत्या. विदेशात शिक्षण पूर्ण करुन भारतात परतलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांची कोल्हापुरच्या अल्बर्ट एडवर्ड हॉस्पीटल मध्ये नेमणुक करण्याचा हेतु होता. परंतु आनंदीबाई जोशीच्या निधनामुळे ते शक्य होऊ शकले नाही. तत्कालीन काळात शाहु महाराजांच्या प्रयत्नामुळे कोल्हापुर संस्थानातील स्त्रीयांच्या साक्षरतेचा दर 0.10 टक्के होता. तो वाढुन 0.35टक्के झाला होता. तसेच बालविवाह बंदी, घटस्फोट, पुनर्विवाह, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन, देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा इ. कायदे केले. असे केवळ शाहु महाराजांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले होते. याचेच फलित म्हणुन आज महिलांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 


स्त्री-पुरुष समता :

राजर्षी शाहु महाराजांनी स्त्री-पुरुष समतेला प्रोत्साहन दिले आहे. स्त्रीयांच्या अधिकारांचे जतन व संरक्षण कसे करता येईल, याकडे अधिक लक्ष दिले होते. जानेवारी 1920 मध्ये वारसा अधिकाराच्या कायद्यामध्ये महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्या. यामध्ये शुद्रांची अनौरस संतती व ब्राम्हण, क्षत्रिय, वौश्य या तीन वरिष्ठ वर्णांची अनौरस संततीना मिळणा·या वारसा अधिकारांतील फरक काढुन टाकण्यात आला. सर्व वर्णांच्या अनौरस संततींना वडिलांच्या संपत्तीत वारसा अधिकार देण्यात आला. दुसरे कलम पतित स्त्रीयांच्या उद्धाराच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. म्हणुन शाहु महाराजांनी स्त्री-पुरुष समानतेचा व समान अधिकारांचा पुरस्कार केला. 


आरक्षणाची तरतुद :

राजर्षी शाहु महाराज यांच्या पुढाकारातुन कोल्हापुर संस्थानातील मागासलेल्या, वंचित समुहांना, ब्राम्हणेत्तरांना शिक्षणाबद्दल फारसी आस्था नसल्यामुळे व त्यांना शिक्षण घेवुनही सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता देखील नव्हती. ही सर्व परिस्थिती शाहु महाराजांनी पाहिल्यानंतर वंचित जाती गटांना नोकरीत संधी मिळावी, सन्मानाने जगता यावे व स्वावलंबी होता यावे म्हणुन 26 जुलौ 1902 रोजी कोल्हापुर संस्थानातील 50 टक्के शासकीय नोक·यांमध्ये मागासलेल्या वर्गासाठी राखीव जागा ठेवल्या असल्याचा जाहिरनामा काढला. राखीव जागांचे, आरक्षणाचे धोरण अंमलात आणणारे राजर्षी शाहु महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते होते. संस्थानातील शाळा, पाणवटे, विहरी, दवाखाने, कचे·या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी 1918-19 मध्ये अनेक वटहुकुम काढला होता. त्यांनी अस्पृश्यांना नोकरीत सामावुन घेतले. समाजातील अनेक प्रतिष्ठित शासकीय नोकरीत सामावुन घेतले. समाजातील त्यावेळच्या तलाठयासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापौकी अनेकांना माहुत, हुलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणुन नेमले. महार वतन खालसा करुन महारांची वेठबिगारीतुन आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातीची हजेरी पद्धत बंद केली. फासे पारधी, कोरवी, माकडवाले इ. भटक्या, विमुक्त जातींना जवळ करुन त्यांना वेगवेगळ्या नोक·या दिल्या. त्यांना आपले रक्षक म्हणुन नेमले होते. 1918 मध्ये खेड्या पाड्यातील बलुतेदारी पध्दतीतुन मुक्त करुन त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले करुन दिले. सर्व ब्राम्हणेत्तरांना राखीव जागाच्या माध्यमातुन सामाजिक न्याय प्रस्थापित केला. हिच भावना स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेत समावि ट करण्यात आली आहे. 


सारांश : 

प्रस्तुत लेखात शाहु महाराजांच्या कार्यातुन सामाजिक न्यायाची प्रेरणा प्राप्त होते. नंतरच्या काळात महारा ट्रातील समाजकारण, राजकारण, सुधारणा, अस्पृश्यता निवारण, स्त्री उद्धार, शिक्षण इ. चे महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. महाराजांच्या कार्याचा गौरव म्हणुन कानपुर येथे कुर्मी क्षेत्रीय सभेने त्यांना 'राजर्षी' पदवी बहाल करण्यात आली. त्यांच्या कार्यामुळे दलित, पददलित, अस्पृश्यांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणुन जनसामान्यांत प्रतिमा निर्माण झाली. आयु यभर दिन दुबळ्याच्या कल्याणासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी अहोरात्र झटत राहीले व आपल्या त्यागातुन सामाजिक न्यायाच्या आधारावर समाजाची पुनर्रचना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीमध्ये सामाजिक न्यायाच्या दृ टीने शाहु महाराजांच्या विचारांना प्राधान्य दिले आहे. 


Sunday, 5 January 2020

महात्मा फुले यांची धर्म चिकित्सा


प्रस्तावना :
महात्मा फुले एकोणिसाव्या शतकातील महान सुधारक आहेत. त्यांनी सामाजिक बदल व परिवर्तनाची दिशा बदलुन शुद्र, अतिशुद्र, स्त्रीया, कामगार, शेतकरी इ. च्या उद्धाराकडे वळवली. महात्मा फुले यांच्या अगोदरच्या सुधारणा नावाला समतामुलक होत्या. परंतु व्यवहारात विविध प्रकारची चाकोरी, विषमता, अगणित भेदभाव व शोषणाच्या व्यवस्थेला आव्हान देण्याचे सामथ्र्य त्या सुधारणा चळवळींनी दाखवले नाही. तर प्रारंभी या सुधारणा मुलगामी नसून ढोबळ स्वरुपाच्या होत्या व विशेषत: ब्रिटीश प्रभावापासुन प्रारंभ झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात जगभरात होणा·या सुधारणांचा परिणाम फुले यांच्यावर पडला. विशेषत: थॉमस पेन च्या 'द राईट्स ऑफ मन', हेनरी मीड, जॉर्ज वॉशिग्टंन, लिंकन इ. च्या प्रभावातुन सामाजिक सुधारणांना बळ मिळाले व 'विद्ये विना मती गेली' या सूत्राने उपेक्षित, वंचित, शोषितांना शिक्षणाचे महत्त्व पटवुन देवुन बहुजनांमध्ये जागृती व आत्मविश्वास निर्माण केला. हजारो वर्षांपासुन भौतिक आणि मानसिक गुलामगिरीत असणा·या सर्व शोषितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले व धर्म चिकित्सेतुन बहुजनांच्या उद्धाराची दिशा निश्चित केली आहे. त्याचा संक्षिप्तपणे आढावा घेवु. 

धर्मचिकित्सा व एकेश्वरवाद :

भारतीय समाजव्यवस्थेचा हिंदु धर्म मुळ आधार आहे. धर्मांधतेतुन अनेक विषमता निर्माण झाल्या. ज्यामुळे शोषणाची व्यवस्था सर्व स्तरात कायम राहीली आहे. त्याचा सर्वाधिक फटका शुद्र, अतिशुद्र, स्त्रीया, कामगार, शेतकरी इ. शोषित व निम्नस्तरांना बसला व आजदेखिल कायम आहे.  धर्माच्या आधारावर होणारे व्यक्तींचे शोषण हे वाईट असुन धर्मासंबंधी मुलगामी विचार करण्याची आवश्यकता फुले यांनी प्रतिपादन केली आणि धर्माच्या आधारावर पसरलेला अत्याचार व वाईट प्रवृत्तीवर प्रहार केला आहे. प्रस्थापित व्यवस्थेतील उणीवांवर नेमके बोट ठेवुन पर्यायी धर्मव्यवस्था कशी उभी करता येईल? याचा विचार केला आहे व धर्माच्या नावाखाली होणारे शोषण थांबवुन शोषणमुक्त समाज निर्मितीचा मुलभूत विचार दिला आहे. महात्मा फुले यांनी धर्मचिकित्सा करुन धार्मिक थोतांडावर कडाडुन टिका केली, परंतु नास्तिक नव्हते. सातकार्यांची प्रेरणा ही परमेश्वरानीच दिली अशी प्रामाणिक भावना फुले यांची होती. सत्यशोध समाजाचे सदस्य प्रत्येक रविवारी (सायंकाळी) नियमितपणे एकत्र जमुन ईश्वराची उपासना करीत असत. एवढेच नाही तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे 'सत्य धर्म समाज' असे नामकरण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

बुद्धीप्रमाण्यता धर्माचा आधार असावा :

बुद्धीप्रमाणवादाचे आग्रही समर्थक असल्यामुळे 'ग्रंथ प्रमाण्य' त्यांनी स्पष्टपणे नाकारले होते. आपल्या समाजाची जडण घडणच मुळात धर्माच्या कुशीतुन झाल्यामुळे सर्व सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा धागा कुठे न कुठे धर्माशी जोडला आहे. त्यामुळे येथील सामाजिक गतिशास्त्र समजुन घ्यायचे असेल आणि ते परिवर्तनाच्या प्रक्रियेत प्रभावीपणे राबवुन घ्यायचे तर धर्माशी फारकत घेवुन चालणार नाही, तर या दुष्ट धर्मसंकल्पनेला अनेक आव्हाने उभी करुन पर्यायी व्यवस्था निर्माण करता येते, अशी धारणा महात्मा फुले यांची होती. ख·या अर्थाने 1890 मध्ये प्रकाशित झालेल्या सार्वजनिक सत्य धर्म या संदर्भ ग्रंथात महात्मा फुलेंना अभिप्रेत असलेल्या धर्माची संकल्पना मांडली आहे. तत्पुर्वी 1873 मध्ये स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या विविध उपक्रमातुन धार्मिक थोतांड, कर्मकांडावर हल्ले केले आहेत. व्याख्याने, लहान-लहान पुस्तीका, सत्यशोधक समाजाचा प्रचार व प्रसार इ. माध्यमातुन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित झाली होती. कर्मकांडावर आघात, स्वार्थी भट व ब्राम्हणशाहीचा दांभिकपणा (ब्राम्हण जात नाही ब्राम्हण्यवाद या अर्थाने), बुवाबाजी, ज्योतिषवाल्यांनी जनमाणसात निर्माण केलेले दैववादाचे भय या पाशातुन जनसामान्याची सोडवणुक करण्यासाठी अनेक पर्यायी पाऊल उचलले आहेत. सर्वसामान्यांचे धार्मिक विधीच्या नावावर होणा·या शोषणातुन मुक्तीसाठी सत्यशोधक विवाह विधी, शुद्र-अतिशुद्र, स्त्रिया, शेतकरी, कामगार इ. मध्ये शिक्षणाच्या माध्यमातुन जागरुकता व आत्मविश्वास निर्माण करुन स्व हक्का विषयीच्या जागृतीचे बीजारोपण केले व यामुळे धर्मशास्त्रांची चिकित्सा करण्यात येवु लागली. सार्वजनिक जीवनात कर्मकांड, धार्मिक अवडंबर नाकारण्याचे सामथ्र्य शिक्षणामुळे प्राप्त झाले. 

धर्म : सार्वजनिक जीवनात समता -

1890 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा एक भाग म्हणुन धार्मिक विधी करण्याचे स्वातंत्र्य ब्रिटीश उच्च न्यायालयाने मान्य केले होते. यामध्ये सत्यशोधक समाज चळवळीचे मुख्य योगदान राहिलेले आहे. म्हणुन अभौतिक, गुढ धार्मिकतेच्या नावावर होणा·या शोषणाबद्दल जागरुकता निर्माण करुन धर्माची व्यावहारिक संकल्पना जनसामान्यात रुजवण्यास फुले यांच्या विचाराचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. धर्म अभौतिक व अद्भुत असुन धर्मावर विशिष्ट वर्गाचे प्रभुत्व आहे व सर्वसामान्यांचे शोषणाचे माध्यम आहे. म्हणुन धर्माची व्यावहारिकता सामान्यांपर्यंत पोहचवण्याचे कार्य महात्मा फुले व सत्यशोधक समाजाने केले आहे. उच्चवर्णीयांचा एक धर्म व दुसरा सर्वसामान्य जनतेचा आचरणशील धर्म असे दोन धर्म संकल्पना पूर्वीपासुनच हिंदु समाजामध्ये चालत आलेल्या होत्या. यापौकी दुसरी धर्म संकल्पनेशी महात्मा फुलेंनी नाते जोडलेले होते. म्हणुन सत्यशोधक चळवळीच्या उपक्रमात तळी उचलण्याचा विधी पार पाडला जात होता. बळी राजाच्या पुराण कथेचा आणि समाजाच्या उपरोक्त दोन स्तरात या कथेच्या संदर्भात दिसुन येणा·या परस्पराविरुद्ध अविष्कारांचा महात्मा फुले यांनी त्या दृष्टीने प्रभावी उपयोग करुन घेतला आहे. याचा विचार करता धर्माचे स्वरुप कर्मकांड, रुढी, परंपरा, अंधश्रद्धा, मानसिक गुलामगिरी इ. प्रकारचा होता. याचा परिणाम असा झाला की, भट व पुरोहित वर्गाचाच अधिक फायदा झाला आणि शुद्र, अतिशुद्र, स्त्रीया इ. ना याचा सर्वाधिक फटका बसला. म्हणुन धार्मिकतेतुन निर्माण झालेली विषमता ताबडतोब नष्ट करणे गरजेचे होते. धर्मामुळे समाजामध्ये निर्माण झालेली अराजकता आणि भौतिक जीवनात आलेली दुरावस्था यांच्यातील आंतरसंबंध स्पष्टपणे जनतेच्या ध्यानात आणुन देण्याची नितांत गरज होती. दैववाद, थोतांड, मिथके ही जनमाणसात रुजवली होती. ती मोडुन काढणे गरजेचे होते. यासाठी शोषीतांमध्ये आत्मभान, जागरुकता निर्माण करुन भौतिक धर्म संकल्पनेचा उद्देश होता. आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सत्ता निर्धारणामध्ये धर्माचा प्रभावीपणे वापर करण्यात येत होता. म्हणुन यावर प्रहार करणे फुले यांना महत्त्वाचे वाटत होते. 


निर्मिक व एकेश्वरवादाची संकल्पना :

धर्म व ईश्वर या संकल्पना एका नाण्याच्या दोन बाजु आहेत. म्हणुन सत्य धर्माला महात्मा फुले यांनी ईश्वर मानले आहे. तो निर्मिक आहे. 'मानवांचा एक धर्म' या 'अखंड' मध्ये लिहीतात की, 

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी। त्याचे भय मनी। धरा सर्व।।1।।
न्यायाने वस्तुचा उपभोग घ्यावा। आनंद करावा। भांडु नये।।2।।
धर्म राज्य भेद मानवा नसावे। सत्याने वर्तावे। ईशासाठी।।3।।
सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो। आर्यास सांगतो। जोती म्हणे।।4।।

प्रस्तुत अभंगामध्ये एकेश्वरवाद स्पष्ट केला आहे. या संदर्भाने महात्मा फुले मुस्लीम धर्मातील एकेश्वरवादाचे समर्थन करतात. महात्मा फुले यांनी ईश्वरास जगाचा निर्माता मानला आहे. जगाची निर्मिती  झाल्यानंतर पुढील सर्व बाबी विज्ञान व निसर्गनियमाने पार पडत असतात. हे नियम ईश्वरीय आहेत, हे मानायला हवेत व बुद्धी प्रामाण्याच्या आधारावर समजुन घेण्यात यावेत. निसर्गामध्ये घडणा·या घटनांच्या तपासणीसाठी बुद्धीप्रमाण्याने विचार करावा. संपूर्ण सत्याची प्रेरणा व्यक्तीला विवेकातुन प्राप्त होत असतो. म्हणुन सर्व व्यक्तीची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. सर्व व्यक्ती समान असतात, समान अधिकार, नियम इ. चा मुलभूत आधार ईश्वर हाच आहे. ईश्वरावरील व्यक्तीची श्रद्धा व विश्वास व्यक्तीला सद्गुणी बनवतो. सत्य व असत्य या कर्माची फळे ईश्वर आपल्याला देत असतो. म्हणुन ईश्वरासंबंधी डेईस्टांचा युक्तीवाद महात्मा फुले यांनी मान्य केला आहे. 

ईश्वरासाठी महात्मा फुले यांनी 'निर्मिक' शब्दाचा उपयोग केला आहे. या माध्यमातुन व्यक्तीने एकमेकाशी कसे वर्तन करावे याचा स्त्रोत आहे. ईश्वर आणि व्यक्ती यांच्यातील आंतरसंबंध द्वंदात्मक आहेत. बदलत्या काळानुसार ईश्वरीय संकल्पनेत बदल होत आला आहे व पुढे चालु राहिल. वर्तमान काळात सामाजिक आदर्श व ईश्वर संकल्पना यांच्यात अंतर पडले असुन हे अंतर कमी झाल्याशिवाय सामाजिक परिवर्तनाला गती मिळणार नाही असे त्यांना वाटत होते. सृष्टीचा निर्माता एकच निर्मिक असून संपूर्ण माणसे त्याचे लेकरे आहेत. निर्मिक हा न्यायी, क्षमाशिल व जनतेचा उद्धारक आहे. मानवी बुद्धी, कल्पना, ज्ञानेंद्रियांच्या कसोटीवर तपासता येणार नाही. असीम, अतितेजस्वी, सत्यरुप आहे. त्याचा साक्षात्कार करुन घेण्यासाठी करण्यात येणारे नानाविध प्रयत्न मुर्खपणाचे आहेत. यापेक्षा व्यक्तीने एवढेच करावे की, सभोतालच्या परिस्थिती व सृष्टीची संपूर्ण माहिती करुन घ्यावी. सृष्टीच्या आंतरक्रियेतुन ईश्वराची इच्छा जाणुन घ्यावी. कृतज्ञतापूर्ण शरण जावे. यापेक्षा कोणतेही कर्मकांड करु नये, अशी महात्मा फुले यांची धारणा होती. महात्मा फुले यांचा निर्मिक भौतिकवादी असुन तो लौकिक, निर्गुण, निराकार ईश्वरापेक्षा व्यक्तीकडे संकेत करणारा आहे. व्यक्तीच्या धर्मविचाराची उद्दिष्टे त्यामुळेच पूर्णपणे भौतिक आहे. भट, पुरोहितांनी स्वार्थासाठी टिकवुन ठेवलेली कर्मकांडे, पुजा, नामस्मरण, नौवेद्य, पुनर्जन्म, अनुष्ठान, यज्ञयाग करणे म्हणजे धर्म नाही. धर्माच्या नावावर शुद्र, अतिशुद्रावर जाचक निर्बंध लादणा·या चातुवण्र्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. एकही 'ग्रंथ प्रमाण्य' संपूर्ण सत्याला धरुन नाही. तर धर्म एकेश्वरनिष्ठा शुद्ध स्वरुपाची श्रद्धा, विवेक, समाजहित, नौतिक आचरण असा आहे, असा महात्मा फुले यांचा विचार होता. 


सारांश :

महात्मा फुले यांच्या धार्मिक विचाराची अतिशय संक्षेपाने चर्चा केली आहे. महात्मा फुले यांची धर्म संकल्पना व ही व्यवहारिक स्वरुपाची होती. धर्माच्या नावावर समाजात वाढलेले स्तोम, कर्मकांड, जातीवाद, वर्ण श्रेष्ठत्व हा सामाजिक बदलातील मोठा अडथळा आहे. सर्व भेद संपुष्टात येवुन समता मुलक समाज निर्माण करण्यासाठी सत्य धर्म व एकेश्वरवाद त्यांना अभिप्रेत होता. केवळ धर्मामुळेच भारतात समाजात विषमता निर्माण झाली आहे. सर्व शोषणाचे मुळ धर्म आहे. म्हणुन धर्म हा अलौकिक व गुढ भौतिकवादी नसुन तो समाजाच्या भौतिक सुख, समृद्धीत समान पद्धतीने वावरणारा व समान लेखणारा असावा म्हणुन वर्तमान धर्माची चिकित्सा करुन सत्य धर्माची वौज्ञानिक दिशा निर्धारित करुन नवसमाज निर्मितीला चालना दिली आहे. 


संदर्भ : 
1. फडके य. दी. (संपा.), महात्मा फुले समग्र वाङ्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई. 1991.
2. नरके हरी (संपा.), महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा, महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन, मुंबई, 1998.
3. जोशी महेश, सत्यशोधक समाजाचा इतिहास, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई. 
4. पाटणकर भारत, महात्मा फुले आणि सांस्कृतिक संघर्ष, लोकवाङमय गृह, मुंबई, 1991.
5. साळुंखे आ. ह., महात्मा फुले आणि धर्म, लोकवाङमय गृह, मुंबई, 1992. 
6. http://archive.org