Monday, 6 January 2020

छत्रपती शाहू महाराजांचे न्याय संबंधी विचार



प्रस्तावना : 
महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारणावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी  शाहु महाराज, व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आहे.  महारा ट्राच्या जडणघडणीत प्रामुख्याने या महापुरुषांचे योगदान राहिलेले आहे. महात्मा जोतीबा फुले यांच्या नंतर शाहु महाराजांनी केलेले कार्य हे उल्लेखनिय आहे. चौथ्या शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर 17 मार्च 1884 रोजी कोल्हापुरच्या गादीवर सत्तेवर विराजमान झाले. 2 एप्रिल 1894 रोजी महाराजांना राज्याधिकार प्राप्त झाला. कोल्हापुर संस्थानाचे पुरोगामी व समाजसुधारक राजा अशी ओळख प्रस्तापित झाली. प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यता, जातीभेद निवारण इ. कार्ये हाती घेतले होते. महाराजांनी प्रशासनाची पुनर्रचना करुन भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ. ब. लट्ठे इ. सारख्या बहुजनातील गुणवंत व्यक्तींना महत्त्वपूर्ण अधिकार पदावर नेमण्यास सुरुवात केली. अशा अनेक कार्यातुन शाहु महाराजांनी अनुभवसिद्ध व व्यावहारिक न्याय प्रयोगशिलतेवर भर दिला. याचे फलित म्हणजे भारतीय राज्यघटनेत न्यायाचे तत्त्व सामावलेले आहे व ते आदर्शवत आहे. प्रस्तुत लेखात शाहु महाराजांच्या कार्यातुन सामाजिक न्यायाच्या प्रेरणा, समाजसुधारणा व समाजपुनर्रचनेत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. काही निवडक उदाहरणावरुन थोडक्यात समजुन घेता येईल. 


अस्पृश्य उद्धार व जातीय निर्मुलनाची दिशा :

शाहु महाराजांनी जाती व अस्पृश्यता निर्मुलनाचा कार्यक्रम हाती घेतला होता. समाजातील या दु ट प्रवृत्तीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी संस्थानामध्ये अस्पृश्यता विरोधी कायदा आणला. अस्पृश्यता ही निसर्ग निर्मित नसुन ती मानव निर्मित आहे. म्हणुन कोणत्याही व्यक्तीने जातीच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचा अनुनय करु नये. सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, सरकारी कार्यालये, शाळा, पानवटे इ. सार्वजनिक ठिकाणावर अस्पृश्यता पाळणा·यांवर कडक शिक्षा करण्याची तरतुद केली होती. कोल्हापुर संस्थानात जातीय तेढ वाढवणारे 'महारवतन' बंद करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. महाराजांनी जाती व अस्पृश्यता सामाजिक पातळीवरुन हद्दपार व्हावी म्हणुन अस्पृश्य जातीतील लोकांना सौनिक व पोलिस, ड्रायव्हर, माहुत, हुलस्वार, कुत्तेवान अशा नोक·यांमध्ये सामावुन घेतले होते. यामुळे येथील विषमता व द्वेशमुलक समाजरचनेला आव्हान उभे केले होते. शाहु महाराजांच्या रुपाने आम्हाला खरा देव मिळाला आहे अशी भावना जनतेत निर्माण झाली होती. मार्च 1920 रोजी महारा ट्र दलित परिषदेचे प्रथम अधिवेशन कोल्हापुर संस्थानातील मानगाव या गावी भरले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभेचे अध्यक्ष होते. विशे ा म्हणजे शाहु महाराज या सभेला उपस्थित होते. 'मुकनायक' महाराजांच्याच सहकार्यामुळे सुरु करण्यात आले होते. या सभेला संबोधित करतांना महाराज म्हणाले,  'तुम्ही तुमचा पुढारी शोधला आहे. याबद्दल मी अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर एकवेळ अशी येईल आंबेडकर सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील.' 30 मे 1920 रोजी अखिल भारतीय बहि कृत समाज परिषद् नागपूर येथे पार पडली. शाहु महाराज अध्यक्ष होते. जनतेला मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले, 'अस्पृश्यता हा शब्द कोणत्याही व्यक्तीला लावणे फार निंदणीय आहे. तुम्ही अस्पृश्य नाहीत. तुम्हास अस्पृश्य मानणा·या पु कळ लोकांपेक्षा अधिक बुद्धीमान, पराक्रमी, सुविचारी, स्वार्थत्यागी असे तुम्ही हिंदुस्थानचे घटकावय आहात. मी तुम्हाला अस्पृश्य समजत नाही. आपण बरोबरीचे भावंडे आहोत. सर्वांना हक्क समान आहेत असे समजले पाहिजे.' या परिषदेचे तिसरे अधिवेशन फेब्रुवारी 1922 मध्ये भरले. यावेळी देखिल शाहु महाराज अध्यक्ष होते. अस्पृश्यता आत्मउद्धार व स्वाभीमान जागवण्याचा सदोदीत प्रयत्न केला आहे. गंगाधर कांबळे नावाच्या अस्पृश्य व्यक्तीला कोल्हापुर येथे हॉटेल सुरु करुन दिले व स्वत: आपल्या लवाजम्यासहित चहा घेण्यासाठी जात असत. यामुळे अस्पृश्यता निर्मुलनात महत्त्वाची दिशा प्राप्त झाली. परिणामी राज्यघटनेत कायद्याच्या माध्यमातुन प्रतिबिंबित होते. 


सर्वांना शिक्षण :

शिक्षण हे सामाजिक प्रगतीचे माध्यम आहे. शिक्षणाशिवाय आत्मविश्वास व आत्मउद्धार करणे शक्य नाही. म्हणुन हजारो वर्णापासुन सामाजिक संधी नाकारलेल्या उपेक्षित, वंचित घटकांना शिक्षणाच्या माध्यमातुन मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न शाहु महाराजांनी केला आहे. आपल्या संस्थानात 1917 मध्ये   सक्तीचे मोफत शिक्षण प्राप्त करण्याचा कायदा केला व प्राथमिक शिक्षणावर भर दिला होता. सर्व शुद्र, अतिशुद्र, महिला या सर्वांना सहज शिक्षण प्राप्त व्हावे म्हणुन 1896 मध्ये पहिले वसतीगृह स्थापन केले. तसेच प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे वसतीगृहे स्थापन केले. 1912 मध्ये अस्पृश्यांच्या शाळांची संख्या 27 होती. यामध्ये अस्पृश्य समजल्या जाणा·या महार, मांग, चांभार, ढोर इ. जातींचा समावेश होता. 

गरिब विद्यार्यांसाठी शि यवृत्ती, वौद्यकीय शिक्षण घेणा·या विद्याथ्र्यांसाठी शि यवृत्त्या, ग्रामीण भागात वाचनालये प्रारंभ करण्यात आले. एकट्या कोल्हापुर नगरामध्ये 22 ते 25 वसतीगृहांची संख्या होती. शाळांची स्थापना करण्यामागे महाराजांचा उद्देश होता तो, माझी जनता  शिक्षण घेवुन विद्याविभुशीत झाली तर मी माझे राज्य जनतेच्या हवाली करेल. असे जाहिर करणा·या आणि प्राथमिक शिक्षणाचा कायदा सुमारे 100 वर्षापुर्वी अंमलात आणणा·या शाहु महाराजांचे शौक्षणिक विचार, कार्यपद्धती, दृष्टेपणा, दुरदृष्टी इ. मुळे कोल्हापुर संस्थानातील जनतेची वौचारिक वाढ होत गेली. यावरुन महाराजांची शिक्षणाविषयीची भूमिका लक्षात येते. शिवाय व्यावसायिक शिक्षणावरही भर दिला होता. 


स्त्री दास्य मुक्ती :

प्राचीन काळापासुन स्त्रीयांना दुय्यम व हीन मानले आहे. ख·या अर्थाने महात्मा फुले यांच्यापासुन स्त्री उद्धाराच्या कार्याला प्राथमिकता देवुन स्त्री दास्य मुक्तीचा मार्ग अवलंबला होता. तेच कार्य शाहु महाराजांनी पुढे चालवुन स्त्रीयांचा उद्धार हाती घेतला होता. स्त्रीयांना दास्यातुन मुक्त करण्यासाठी शिक्षण हे प्रभावशाली माध्यम आहे. म्हणुन स्त्रीयांच्या शिक्षणावर अधिक भर दिला होता. हुशार मुलींना शि यवृत्ती देण्यात येत होत्या. प्रौढ स्त्रीयांच्या शिक्षणा बाबत विशेष  महत्त्व दिले. 1919 मध्ये मागासवर्गीय स्त्रीयांसाठी राहण्याची व जेवण्याची मोफत व्यवस्था केली होती. जेंव्हा लिटल मैडम या ब्रिटीश महिला शिक्षणाधिकारी मायदेशी परतल्या नंतर त्यांच्या जागेवर राजर्षी शाहु महाराजांनी कोल्हापुरातील फिमेल ट्रेनिंग स्कुल मध्ये शिक्षिका असणा·या रखमाबाई केवळकर या महिलेची नेमणुक केली होती. पुढे त्यांनी स्त्री शिक्षणाला अधिक गती दिली होती. शाहु महाराजांनी मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणुन त्यांना विविध प्रकारची बक्षिसे व शि यवृत्त्या देण्यास सुरुवात केली. स्त्रीयांसाठी अहिल्याबाई मुलींची शाळा, लक्ष्मीबाई मुलींची शाळा या हेतुनेच प्रारंभ करण्यात आल्या होत्या. विदेशात शिक्षण पूर्ण करुन भारतात परतलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांची कोल्हापुरच्या अल्बर्ट एडवर्ड हॉस्पीटल मध्ये नेमणुक करण्याचा हेतु होता. परंतु आनंदीबाई जोशीच्या निधनामुळे ते शक्य होऊ शकले नाही. तत्कालीन काळात शाहु महाराजांच्या प्रयत्नामुळे कोल्हापुर संस्थानातील स्त्रीयांच्या साक्षरतेचा दर 0.10 टक्के होता. तो वाढुन 0.35टक्के झाला होता. तसेच बालविवाह बंदी, घटस्फोट, पुनर्विवाह, आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन, देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा इ. कायदे केले. असे केवळ शाहु महाराजांच्या प्रयत्नामुळे शक्य झाले होते. याचेच फलित म्हणुन आज महिलांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 


स्त्री-पुरुष समता :

राजर्षी शाहु महाराजांनी स्त्री-पुरुष समतेला प्रोत्साहन दिले आहे. स्त्रीयांच्या अधिकारांचे जतन व संरक्षण कसे करता येईल, याकडे अधिक लक्ष दिले होते. जानेवारी 1920 मध्ये वारसा अधिकाराच्या कायद्यामध्ये महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्या. यामध्ये शुद्रांची अनौरस संतती व ब्राम्हण, क्षत्रिय, वौश्य या तीन वरिष्ठ वर्णांची अनौरस संततीना मिळणा·या वारसा अधिकारांतील फरक काढुन टाकण्यात आला. सर्व वर्णांच्या अनौरस संततींना वडिलांच्या संपत्तीत वारसा अधिकार देण्यात आला. दुसरे कलम पतित स्त्रीयांच्या उद्धाराच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. म्हणुन शाहु महाराजांनी स्त्री-पुरुष समानतेचा व समान अधिकारांचा पुरस्कार केला. 


आरक्षणाची तरतुद :

राजर्षी शाहु महाराज यांच्या पुढाकारातुन कोल्हापुर संस्थानातील मागासलेल्या, वंचित समुहांना, ब्राम्हणेत्तरांना शिक्षणाबद्दल फारसी आस्था नसल्यामुळे व त्यांना शिक्षण घेवुनही सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता देखील नव्हती. ही सर्व परिस्थिती शाहु महाराजांनी पाहिल्यानंतर वंचित जाती गटांना नोकरीत संधी मिळावी, सन्मानाने जगता यावे व स्वावलंबी होता यावे म्हणुन 26 जुलौ 1902 रोजी कोल्हापुर संस्थानातील 50 टक्के शासकीय नोक·यांमध्ये मागासलेल्या वर्गासाठी राखीव जागा ठेवल्या असल्याचा जाहिरनामा काढला. राखीव जागांचे, आरक्षणाचे धोरण अंमलात आणणारे राजर्षी शाहु महाराज हे भारतातील पहिले राज्यकर्ते होते. संस्थानातील शाळा, पाणवटे, विहरी, दवाखाने, कचे·या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी 1918-19 मध्ये अनेक वटहुकुम काढला होता. त्यांनी अस्पृश्यांना नोकरीत सामावुन घेतले. समाजातील अनेक प्रतिष्ठित शासकीय नोकरीत सामावुन घेतले. समाजातील त्यावेळच्या तलाठयासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापौकी अनेकांना माहुत, हुलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणुन नेमले. महार वतन खालसा करुन महारांची वेठबिगारीतुन आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातीची हजेरी पद्धत बंद केली. फासे पारधी, कोरवी, माकडवाले इ. भटक्या, विमुक्त जातींना जवळ करुन त्यांना वेगवेगळ्या नोक·या दिल्या. त्यांना आपले रक्षक म्हणुन नेमले होते. 1918 मध्ये खेड्या पाड्यातील बलुतेदारी पध्दतीतुन मुक्त करुन त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले करुन दिले. सर्व ब्राम्हणेत्तरांना राखीव जागाच्या माध्यमातुन सामाजिक न्याय प्रस्थापित केला. हिच भावना स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेत समावि ट करण्यात आली आहे. 


सारांश : 

प्रस्तुत लेखात शाहु महाराजांच्या कार्यातुन सामाजिक न्यायाची प्रेरणा प्राप्त होते. नंतरच्या काळात महारा ट्रातील समाजकारण, राजकारण, सुधारणा, अस्पृश्यता निवारण, स्त्री उद्धार, शिक्षण इ. चे महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. महाराजांच्या कार्याचा गौरव म्हणुन कानपुर येथे कुर्मी क्षेत्रीय सभेने त्यांना 'राजर्षी' पदवी बहाल करण्यात आली. त्यांच्या कार्यामुळे दलित, पददलित, अस्पृश्यांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणुन जनसामान्यांत प्रतिमा निर्माण झाली. आयु यभर दिन दुबळ्याच्या कल्याणासाठी, हक्कासाठी, न्यायासाठी अहोरात्र झटत राहीले व आपल्या त्यागातुन सामाजिक न्यायाच्या आधारावर समाजाची पुनर्रचना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीमध्ये सामाजिक न्यायाच्या दृ टीने शाहु महाराजांच्या विचारांना प्राधान्य दिले आहे. 


No comments:

Post a Comment